रविवार, ११ डिसेंबर, २०१६





राष्ट्रीयीकृत बँकांच्या कारभारावर नाराजी : 

एटीएम समोर गर्दीच गर्दी  , तर रक्कमे अभावी अनेक एटीयम बंद



 निलेश  चाळक मो,९७६७८९४६१९ बीड : नोटाबंदीचा निर्णय होऊन ३१ दिवसांचा कालावधी उलटला असून बीड जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीयकृत बँकांसह विविध बँकांमध्ये अजूनही ग्राहकांची गर्दी ओसरलेली नाही. या गर्दीत शेतकरी, कर्मचारी, व्यापारी व सर्वसामान्य खातेदार यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामाच्या मशागत कामासाठी तसेच बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची निकड भासत आहे. त्यामुळे ते बँकांकडे येत आहेत. मात्र बँकांकडे नोटांची टंचाई असल्याने व रिझर्व बँकेकडून बीड जिल्ह्याला पुरेसे चलन उपलब्ध करून देण्यात न आल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना समाधानकारक रक्कम आपल्या खात्यातून मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या कारभाराप्रती कमालीची नाराजी पसरली आहे.तर रक्कमे अभावी अनेक एटीयम बंद आहेत काही ठिकाणी सुरू आहेत त्याठिकाणी एटीएमच्या बाहेर गर्दीच आहे


मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६



चालू हिवाळी आधिवेशनात मराठा आरक्षण मार्गी लावा 

 निलेश चाळक याची मुख्यंमत्र्यांकडे मागणी
 नागपुर / बीड - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विीध समाजिक सघंटना व राजकिय पक्षाच्यावतीने अनेक वेळा मोर्चे आदोंलने करण्यात आली आहेत आणि तसेच काही महीण्यापुर्वी मराठा समाजाने लाखोंच्या सख्येंने मुक मोर्चे काढले तरी देखील आपल्या सरकारने या मराठा मोर्चाची दखल घेतली नाही त्यामुळे मराठा समाजातून त्रीव स्वरूपाचा सतांप व्यक्त केला जात आहे त्यामुळे सरकारने चालू हिवाळी आधिवेशनात मराठा आरक्षण मार्गी लावण्यात यावे अशी मागणी मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती आयटी सेलचे जिल्हाप्रमुख निलेश चाळक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे यावेळी त्यानी शासन दरबारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्याण्यात यावे व महाराष्ट्रात मराठा महिलावर होणार्या आत्याचाराच्या विरोधात कडक कायदा करावा व मराठा विद्यार्थाना शैक्षणिक कर्ज द्यावे व मराठा विद्याऱ्थांनसाठी राज्यात वस्तीग्रह स्थापन करावे ,शेतकर्याच्या मालाला हमि भाव देउन निर्यात बंदी उठवावी ,शेतकर्याचे कर्ज़ माफ करावे ,मराठ्याच्या ईतिहासाचे विकृतिकरण थाबवावे व बाबा पुरंदरे यानां दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार सरकार ने परत घ्यावा, छञपति शिवाजी महाराज,शाहु-फुले-आंबेडकर याच्या वास्तुचे व गड-किल्ल्याचे संवर्धन करण्यात यावे , आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडाळाचि वार्षिक तरतुद दहा हजार कोटी रूपये करण्यात यावी व तसेच शिवप्रहार सघंटनेचे सजींव भोर याच्यावर हल्ला करणार्या आरोपी वर कठोर कारवाई करण्यात यावी व चालू हिवाळी आधिवेशनात मराठा आरक्षण मार्गी लावण्यात यावे अशी मागणी मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती आयटी सेलचे जिल्हाप्रमुख निलेश चाळक ,व शिवसग्रामचे युवा नेते आशोक ढोले,संकल्प युवा प्रतिष्ठानचे प्रशांत डोरले,शिवकार्य प्रतिष्ठानचे दत्ता जगताप यानी मुख्यमत्र्यांकडे केली आहे